भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी
तरुणांना प्रेरणा देणारी ७५ वर्षीय शेतकऱ्यांच्या श्रमाची 'नाचणी' दुर्गम, डोंगर उतारावर, जेथे निराशा आपले तळ ठोकून बसते, तेथेच काही श्रमजीवी हात मातीशी बालपणापासून संवाद साधत आहेत. चिपळूण तालुक्यातील भैरवगडाच्या पायथ्याशी वसलेल्या तळवडे ग्रामपंचायतीमधील पाते या वाडीत दत्ताराम धामणकर (वय ७५), काशिराम निकम (वय ७५), आणि राजाराम धामणकर (वय ५५) या तिघांची कष्टमय गाथा केवळ शेती नाही, तर अखंड जिद्दीचा मंत्र आहे. काही शेतकरी जेव्हा "आमची शेती दुर्गम आहे, पडीक आहे, आता त्यात काही राहिलं नाही," अशी निराशेची भाषा बोलून दाखवतात, तेव्हा याच डोंगरउतारावरील या ज्येष्ठ शेतकऱ्यांचे श्रम विशेषतः युवा पिढीला एक तेजस्वी प्रेरणास्रोत ठरतात. गावचे पोलीस पाटील बळीराम साळुंखे यांच्यासह या शेतीला प्रत्यक्ष भेट देवून त्यांच्या श्रमाची कहानी जाणून घेतली. श्रमाचा महामंत्र: या तिन्ही शेतकऱ्यांचे जीवन म्हणजे मातीचे अधिष्ठान आणि घामाचे तीर्थ आहे. ते दररोज या कठ...
Comments
Post a Comment