Posts

Showing posts from July, 2020

चटका

माझ्या गावापासून वीसएक किलोमीटरवर इचलकरंजी हे गाव आहे. मी त्यावेळी बीएडला होतो. मला आजही आठवते. तो कॉलेजचा पहिलाच दिवस होता. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वत:ची ओळख करून देण्यासाठी पाच मिनीटे देण्यात आली होती. जेमतेम पाच फूट उंची, एकशिवडी देहयष्टी, काहीसे मळलेले, चुरगळलेले, कपडे आणि डाव्या पायाने लंगडत चालणारा एकजण समोर उभा होता. “मी विजय घोडके ! मंगळवेड्याचा..अं..” बोलताना तो कधी खिश्यात हात घाली. तर कधी दोन्ही हातांची बोटे एकमेकात मिसळे. दिलेला पाच मिनीटांचा अवधी निसटून जात असतानाच आणखी काय बोलायचे ? हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते.  एकाएकी आठवल्यागत करून तो म्हणाला, “दामाजीपंत तुम्हाला माहीत असतीलच..ते माझ्याच..म्हणजे मी त्याच गावचा..मंगळवेढ्याचा..” आणि त्याची पाच मिनीटे संपली. ‘बिदरच्या बादशहाच्या काळात मंगळवेढ्याचे तहसिलदार असणाऱ्या दामाजीपंतांनी दुष्काळात होरपळणाऱ्या आपल्या जनतेसाठी शिक्षेची पर्वा न करता, सरकारी धान्याचे कोठार उघडून दिले. इतकेच या निमित्ताने आठवले. मात्र, साक्षात पांडूरंगाने विठू महाराच्या रूपात बादशहाकडे जावून, सहाशे खंडी धान्याचे एक लक्ष वीस हजार मोहर...

मोडीत निघालेल्या मोडीची वाढतेय गोडी

Image
बाराव्या शकतकापासून सुरू झालेली राज दरबारातील मोडी लिपी 1960 नंतर व्यवहारातूनही मोडीत निघाली. परंतु, याच मोडीची गोडी पुन्हा एकदा वाढत आहे. लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या वेळेत ऑनलाईन मोडी शिकण्याकडे आणि शिकवण्याकडे कल वाढल्याचेही दिसून येत आहे. महाराष्ट्रात सुमारे 12 व्या शतकापासून मोडी लिपीची सुरूवात झाली असे इतिहासकारांचे मत आहे. श्री. हेमाद्रीपंत ते या लिपीचे जनक होते. न मोडता, न थांबता अत्यंत जलद गतीने लफ्फेदारपणे झरझर लिहील्या जाणाऱ्या लिपीस मोडी असे म्हणतात. यादव काळापासून सुरू झालेला हा प्रवास शिवकाळात बहरला होता. या लिपीचा सर्रास वापर राजदरबाराबरोबरच लोकांच्या दैनंदिन जीवनात 20 व्या शतकाच्या अखेरपर्यंत होत असे. महाराष्ट्रातील प्राथमिक शाळात 1960 पर्यंत तिचा समावेश शिक्षणात होता. परंतु, छपाईच्या दृष्टिने तिची मर्यादा लक्षात घेवून काळाच्या ओघात ही मोडी लिपी मोडीत निघाली. मोडी लिपीचा प्रसार आणि प्रचार शिवकाळात झाला. आजही शिवकाळातील व पेशवाई काळातील कागदपत्रे पाहिली तर बहुसंख्य कागदपत्रे ही मोडी लिपीतूनच असल्याचे दिसून येते....

बळी

उशाला दंडोबाचा डोंगर, पायाशी कावडीचा डोंगर, पुढे शुक्राचा डोंगर. अशा या डोंगर रांगांमधून विस्तीर्ण पसरलेल्या जाखाईच्या पठारावर वाड्या-वस्त्यांनी आपल्या पथाऱ्या पसरलेल्या. दिवस कासराभर वर आला होता. रखरखीत ऊन आग ओकीत होतं. अंगाची नुसती ल्हाई उडत होती. कुठंतरी गारव्याला बसून राहावसं वाटत होतं. अंगणात बसून, सारखं शेपटी उडिवणाऱ्या बोक्याबरोबर राम्या खेळत होता. जोरात शेपटी ओढताच ‘फिस’ करून तो राम्याच्या अंगावर गेला.  “हत..भोसडीच्या माझ्या अंगावर येतोस, थांब कापतोच तुला.” असं म्हणत राम्या त्याच्या मागे गेला. तसं बोक्याने लगेचच समोरच्या भिंतीवरून उडी  टाकली  आणि तो पसार झाला. हातभर लांब जिभ बाहेर काढून मोत्या कुत्रं सारख ‘ह्या-ह्या’ करत धापा टाकत बसून होतं. आता राम्या त्याच्याकडे वळला होता. कुत्र्याच्या पाठीवर उलटा बसत तो त्याच्या आधिच वाकड्या असणाऱ्या शेपटीला चिंधीचा गोंडा बांधत बसून होता.  चहाचं काळं कढूत पाणी ढोसून शिरपानं गोठ्यातली बैलजोडी सोडली, ‘चलतो..गं..’ म्हणून एकवार त्यानं बायकोला सांगितलं आणि तो रस्त्याला लागला. तशी ती धावत बाहेर आली. उंबऱ्याला रेटा देत आतूनच म्हण...

इंडिया टुडे अन् दोज डेज

Image
    एकलम खाजे.. है..शा. दुब्बी राजे..है.. शा. तिरान भोजे.. है..शा. चारी चौकटी..है..शा..पंचम पांडव..है..शा..या आरोळ्यांमध्ये सगळे रश्शी खेचताहेत आणि रंगमंचकावरील पडदा बाजूला होतोय..हळूवार पसरत जाणाऱ्या स्पाॕट लाईटमध्ये पांढऱ्या रंगाच्या नेहरु शर्ट आणि तुमानीत निवेदक अवतरतो..       "१५ आॕगस्ट १९४७ ! भारताच्या इतिहासातील सोनेरी दिवस ! हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. काही फासावर लटकले तर, काहिंनी इंग्रजांच्या बंदुकीच्या गोळ्यांनी भारतमातेस आपल्या रक्तांनं न्हाऊ घातलं. रक्त मातीत मिसळलं. मातीचं सोनं झालं. इंग्रज हिंदूस्थानातून निघून गेले. लाल किल्ल्यावर तिरंगा फडकला. स्वतंत्र भारतात लोकशाही नांदू लागली. लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य लोकराज्य ! स्वतंत्र भारतातील नागरिक मोठ्या अभिमानानं आपली प्रतिज्ञा गाऊ लागला..!       इयत्ता आठवी आणि नववीला असताना श्री तुकाराम मोरेसर आणि श्री विवेक स्वामीसरांनी "इंडिया टुडे" ही जीवनकुमार शिंदे लिखित एकांकिका बसवली. भरत पाटील, शांतीभूषण तेरदाळे, समीर नानीवडेकर, शेखर गंगधर, संजय जि...